Showing posts with label L-आत्माराम सावंत. Show all posts
Showing posts with label L-आत्माराम सावंत. Show all posts

या मीरेचे भाग्य उजळले,Ya Meereche Bhagya Ujalale

या मीरेचे भाग्य उजळले
गिरिधर माझ्या स्वप्नी आले

आळवीत मी होते भजनी
देखियले नव्हते नयनांनी
आज मला ते सौख्य लाभले

व्यथा मनाची आता सरली
जननिंदेची भीती नुरली
भवसागर मी तरले तरले

मीरेसंगे नाचे मोहन
तालहि धरिती पायी पैंजण
रात संपली केव्हा नकळे

त्या सावळ्या तनूचे,Tya Savalya Tanuche

त्या सावळ्या तनूचे
मज लागले पिसे ग
न कळे मनास आता
त्या आवरू कसे ग !

ये ऐकण्यास जेव्हा
त्याचा सुरेल पावा
चोहीकडे बघे मी
परि ना कुठे दिसे ग !

हलतो तरू-लतांत
हा खोडसाळ वात
आलाच वाटतो 'तो'
मी सारखी फसे ग !

खुपते तनूस शेज
क्षणही न येत नीज
डोळ्यांस तो दिसावा
हृदयात जो वसे ग !