वादळे ऊठतात किनारे,Vadale Uthatat Kinare

वादळे ऊठतात किनारे सुटतात
नशिबाशी फुटतात लाटा
पाऊले थकतात शेवटी अवचित
जगण्याच्या वळतात वाटा
सारंगा रे सारंगा !

माणसा ही तुझी गोष्ट आहे जुनी
चालताना पुन्हा सांगते रे कुणी
हुंदके सरतात आसवे उरतात
जगण्याचा सलतोच काटा

हे ऋतू कोणते येत-जाती असे
जीवनाला नवे देत जाती पिसे
थांबणे नसतेच चालणे असतेच
रस्त्यांना फुटतोच फाटा

No comments:

Post a Comment