आता जगायाचे असे माझे, Aata Jagayache Ase Majhe

आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले ?
माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले ?

हदुयात विझला चंद्रमा .... नेत्री न उरल्या तारका ....
नाही म्हणायाला तुझे हे आपुलेपण राहिले !

अजुनी कुणास्तव तेवतो हा मंद प्राणाचा दिवा ?
अजुनी मला फसवायला कुठले निमंत्रण राहिले ?

ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे ....
मी मात्र थांबुन पाहतो- मागे कितीजण राहिले ?

कवटाळुनी बसले मला दाही दिशांचे हुंदके
माझे अता दुःखासवे काही न भांडण राहिले !

होता न साध्य एवढा जो शब्द मी तुजला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले !

अवघ्या विजा मी झेलल्या, सगळी उन्हे मी सोसली ...
रे बोल आकाशा, तुझे आता किती पण राहिले ?

ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे
हे आसवांचे तेवढे अद्याप तोरण राहिले !

1 comment:

  1. PLEASE BE CATEFUL ABOUT THE TEXT OF POEM. ITS A HUGE LIERARY CRIME TO CHANGE OR INSERT THE WHICH SPOS THE WHOLE POEM !
    HRER IN SIXTH STANZA OF THE POEM THE WORD SHOULD BE "साधा" INSTEADOF "साध्य" !!

    ReplyDelete