नको वाजवू श्रीहरी,Nako Vajavu Shrihari

नको वाजवू श्रीहरी मुरली
तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे

खुंटला वायुचा वेग, वर्षती मेघ
जल स्थिरावली

घागर घेऊन पाणियासी जाता
डोईवर घागर पाझरली
एका जनार्दनी पूर्ण कृपेने
राधा गौळण घाबरली

1 comment:

  1. अनाहत नादातील सर्वोच्च नाद वेणुनाद आहे. तो जेंव्हा सद्गुरु कृपेने साधकाला ऐकु येऊ लागतो तेंव्हा तो समाधी अवस्थेत ओढला जाऊ लागतो, अत्यांतिक आनंदात तहान, भुक विसरतो. सुषुम्ना चालु असते व श्वास मंदावतो किंवा बंद असतो त्यामुळे प्राण स्थिरावला जातो. त्याचवेळी सहस्त्रारातील अमृताचे तळे पाझरत असते व टाळूतून जिभेवर ते अमृत येते. या सर्व अध्यात्मिक अनुभवांमुळे तो साधक घाबरतो असे श्री.महाराज या अभंगातून सांगतात.

    ReplyDelete