Showing posts with label M-सुहासचंद्र कुलकर्णी. Show all posts
Showing posts with label M-सुहासचंद्र कुलकर्णी. Show all posts

जरा विसावू या वळणावर,Jara Visavu Ya Valanavar

भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर

कसे कोठुनी येतो आपण

कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो उगाच रुसतो
क्षणात आतुर क्षणात कातर

कधी ऊन तर कधी सावली
कधी चांदणे कधी काहिली
गोड करूनिया घेतो सारे
लावुनिया प्रीतिची झालर

खेळ जुना हा युगायुगांचा
रोज नव्याने खेळायाचा
डाव रंगता मनासारखा
कुठली हुरहुर कसले काहूर

गुज ओठांनी ओठांना,Guj Othani Othana

गुज ओठांनी ओठांना सांगायचं
एका पावसात दोघांनी भिजायचं

तसं कधीचं आभाळ आलंय भरून

जळ ढगात साकळे केव्हापासून
वेडं उधाण कशाला रोखायचं

खुळा पाऊस डसेल सर्वांगाला
आता नको किनारा आवेगाला
धुंद धारांच्या रानात घुसायचं

गाणं मनातलं पावसात येईल फुलून
तुझ्यामाझ्यातलं अंतर जाईल पुसून
बीज नवीन गाण्याचं पेरायचं